Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Heavy Rain : नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे पशुधन दगावले

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी जिल्ह्यातील २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. नदी नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये १२ जनावरे मृत्युमुखी पडली असून २१ घरांची अंशतः पडझड झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

आपत्ती व्यवस्थापन, कृषी, पाटबंधारे, महसूल व पोलिस विभाग स्थितीवर लक्ष ठेवून आहे. ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैनात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे. दरम्यान महसूल विभागाच्या सतर्कतेने मुदखेड तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकाची सुटका करण्यात आली आहे. शनिवारी व रविवारी पावसाची दमदार हजेरी सुरू होती.

शनिवारी जिल्ह्यातील २६ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. किनवट, माहूर, हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाली. नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनामा पाऊस थांबल्यानंतर करण्यात यावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहे.

दहा वाजेपर्यंत १३६ मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला. तालुक्याच्या सिंदगी, उमरी बाजार व किनवट या मंडळात पावसाचा जोर अधिक आहे. हिमायतनगर, माहूर, हदगाव, भोकर, अर्धापूर, मुदखेड या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर आहे.

नागरिकांनी नाले, ओढे, तलावाच्या भागात जाणे टाळावे असेही प्रशासनाने आवाहन केले आहे. जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये सततच्या पावसामुळे वाढ होत आहे. नदी धरणे व बंधाऱ्यांपुढील नदीपात्रा नजीक राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गोदावरी नदीवरील दिग्रस बंधाऱ्याचे दोन दारे उघडण्यात आली आहे. अंतेश्वर बंधाऱ्याची सर्व दारे उघडण्यात आली आहे. पूर्णा नदीवरील सिद्धेश्वर धरणाची दारे उघडली आहे. त्यामुळे विष्णुपुरी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असून या बंधाऱ्याचे ११ दरवाजे उघडण्यात आले. आमदुरा बंधाऱ्याचे १६ पैकी ११ दरवाजे उघडण्यात आले आहे.

त्या खालील बडेगाव धरणाचेही नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे. अप्पर मानार या धरणातून ६ दरवाजे उघडण्यात आले आहे. इसापूर धरणाच्या खालील बाजूस अतिवृष्टी होऊन पैनगंगा नदीपात्रात गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अंतर्गत वाहणाऱ्या सर्व नद्या तुडुंब वाहत असून नागरिकांनी आवश्यकता नसेल तर पुलावरून पाणी असल्यास पूल ओलांडू न,ये असे आवाहन करण्यात आले आहे.

नुकसान स्थिती अशी..

प्राथमिक अंदाजानुसार व आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात झालेल्या अतिवृष्टी मध्ये सहा मोठी दुधाळ जनावरे, पाच छोटी दुधाळ जनावरे एक बैल मृत्युमुखी पडले आहे तर २१ घरांची अंशतः पडझड झाली आहे. जिल्ह्यामध्ये २४ तासात सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT