Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : जायकवाडीच्या डाव्या-उजव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी

Jaykwadi Dam Water Release : मराठवाड्यातील सर्वात मोठा प्रकल्प नाथसागर असून याचा लाभ शेतीसह औद्योगीकरण व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत आहे.

Team Agrowon

थोडक्यात माहिती :

  1. नाथसागर (जायकवाडी) धरणात ७७% जलसाठा झाल्यानंतर खरीप हंगामासाठी डाव्या व उजव्या कालव्यांतून पाणीपाळी सुरू करण्यात आली आहे.

  2. डाव्या कालव्यातून १०० ते ४०० क्युसेक तर उजव्या कालव्यातून २०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

  3. उभ्या पिकांना दिलासा मिळावा म्हणून जलसंपदा मंत्र्यांच्या निर्देशाने ही पाणीपाळी सुरू करण्यात आली.

Chh. Sambhajinagar News : जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून खरीप हंगाम २०२५ संरक्षणात्मक पाणीपाळी बुधवारी (ता. १६) सुरू करण्यात आली. डाव्या कालव्यातून सुरुवातीला १०० क्युसेक तर उजव्या कालव्यातून २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तो गुरुवारी (ता. १७) सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक, तर उजव्या कालव्यातून २०० क्युसेकने सुरू होता.

मराठवाड्यातील सर्वात मोठा प्रकल्प नाथसागर असून याचा लाभ शेतीसह औद्योगीकरण व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत आहे. नाशिक जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे वरील धरणातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात आला.

जून महिन्याच्या सुरुवातीपासून अहिल्यानगर व नाशिक विभागातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली. यामुळे धरणांमध्ये ७७ टक्के पाणीसाठा झाला.

लाभक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने उभी पिके ताणावर आली होती. त्यामुळे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठवाड्यातील आमदाराची विनंती मान्य करून पाणी सोडण्याचे तत्काळ आदेश दिले. त्या अनुषंगाने बुधवारी जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, सेवानिवृत्त मुख्य अभियंता जोगदंड यांच्या उपस्थितीमध्ये डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले.

गुरुवारी सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान डाव्या कालव्यातील विसर्ग ३०० क्युसेक करण्यात आला. गुरवारी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान डाव्या कालव्यातून विसर्ग १०० क्युसेकने वाढवून ४०० क्युसेक करण्यात येणार, अशी माहिती उपअभियंता मंगेश शेलार यांनी दिली.

दुसरीकडे उजव्या कालव्यातून २०० क्युसेकने विसर्ग सुरू होता. पाणी सोडतेवेळीं उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, उपविभागीय अभियंता श्रद्धा निंबाळकर, धरण अभियंता मंगेश शेलार, शाखा अभियंता रितेश भोजने, संदीप कुल्ले, गणेश खराडकर, आबासाहेब गरूड, शशिकांत डमाळे, अब्दुल बारी गाजी, अप्पासाहेब तुजारे, संजय चव्हाण, रामनाथ तांबे अधिकारी उपस्थित होते.

जायकवाडी धरणातून पाणी का सोडले जात आहे?
➡️ खरीपातील उभी पिके ताणावर आल्यामुळे संरक्षणात्मक पाणी देण्यात येत आहे.

2. विसर्ग किती प्रमाणात सुरू आहे?
➡️ डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक आणि उजव्या कालव्यातून २०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

3. यामुळे कोणत्या भागाला फायदा होतो?
➡️ मराठवाड्यातील जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील शेतीला याचा थेट फायदा होतो.

4. धरणात सध्या किती टक्के पाणीसाठा आहे?
➡️ जायकवाडी धरणात सध्या सुमारे ७७% जलसाठा आहे.

5. पाणीपाळी कधी सुरू झाली?
➡️ बुधवार, १६ जुलै २०२५ पासून पाणीपाळी सुरू झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly: आमदारांच्या कार्यकर्त्यांना विधिमंडळ परिसरात बंदी; अध्यक्षांचा निर्णय

Crop In Crisis : निलंग्यात ८० हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

Jal Jeevan Mission : लातूर जिल्ह्यातील गावागावांतील ‘जल जीवन’ला घरघर

Agrowon Podcast: बेदाण्याचे दर तेजीत, काकडीला मागणी, चिकू महागला; बाजरीचे दर स्थिर, तुरीचे दर दबावात

Flood Management : महापूर येऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या?

SCROLL FOR NEXT