Team Agrowon
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणाऱ्यांची, लिहिणाऱ्यांची संख्या कमी नाही. कोणी त्याला ‘राजा’ संबोधते, तर कोणी त्याला ‘जगाचा पोशिंदा’ म्हणते. वास्तवात त्याच्या जीवनाच्या किती समस्यांना यामुळे फुंकर घातली जाते, माहीत नाही.
कारण आपल्या आजूबाजूला पाहिलं, तर हा राजा कधीही जगण्या-जगवण्याचा (स्वतःला, परिवाराला आणि सोबतचं आपल्या पिकाला) संघर्षात अडकून पडलेला दिसतो. हा संघर्ष कधी सर्वांच्या दृष्टीस पडणारा असतो,
तर कधी कधी हा संघर्ष शेतकऱ्याला अगदी एकट्यात रडवणारा, त्याच्या मनाची छिन्नी-छिन्नी करणारा असतो. असे संघर्ष सर्वांना दिसत नाहीत, त्याचे चिन्ह आणि परिणाम मात्र आपल्याला ओळखता येतात.
‘शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने जुळत नाहीत’ हा एकप्रकारे एका मुलाचा बाप म्हणून शेतकऱ्यासाठी संघर्षचं आहे आणि हो, आता यावर चर्चा होणे तितकेच गरजेचे आहे.
आयुष्यभर उन्हातान्हात, पाऊस-पाण्यात जिवाचा आकांत करून, अस्मानी संकटाशी दोन हात करून अन्नधान्य पिकवणारा शेतकरी जेव्हा स्वतः आपल्या उतारवयात येतो आणि आतातरी आयुष्यात शांततेचे दोन क्षण निवांत होऊन जगता येईल का,
सूनबाई-नातवंड यांनी बहरलेला परिवार पाहून कृतार्थ जीवन सार्थकी लागल्याचे समाधान मिळेल का, नातवंडांना अंगा-खांद्यावर खेळवण्याचे सुख मिळेल का, हा विचार करतो तेव्हा मात्र त्याच्या पदरी निराशाच येते, असे आजच्या शेतकरी समुदायाचे चित्र आहे.
काहीही झालं, की शेतकरी कुठं शिकलेला असतो, त्याला काय एवढं कळतं त्यातलं, असा दृष्टिकोन बाळगणाऱ्यांची कमी नाही, परंतु तो माणूसच आहे, त्यालाही मन आहे, त्यालाही वेदना होतात, हे आपण ओळखलं पाहिजे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.