Anil Jadhao
केंद्र सरकारने उसाच्या ‘एफआरपी’त टनाला १५० रुपयांची वाढ केली. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचं म्हटलं जातय.
एफआरपी वाढवताना रिकव्हरी बेस १० टक्क्यांवरून १०:२५ केला. त्यामुळं एफआरपीतील प्रत्यक्ष वाढ कमीच आहे.
एफआरपीचा ०.२५ टक्क्याने रिकव्हरी बेस वाढविल्याने प्रत्यक्षात ७६ रुपये एफआरपी वाढ झाली आहे.
ज्या भागात रिकव्हरी कमी आहे, अशा शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसेल. गेल्या हंगामात औरंगाबाद, अमरावती, नागपूर, सोलापूर आदी जिल्ह्यांत दहा टक्केच्या आत रिकव्हरी होती.
दुसऱ्या बाजूला साखर कारखान्यांनी तोडणी वाहतूक खर्च वाढविला आहे. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
कमी रिकव्हरी दाखवून कारखाने ऊस उत्पादकांची फसवणूक करू शकतात, असे शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
दुसरीकडे साखर कारखान्यांनी साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याची मागणी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.