Roshani Gole
पावसाळ्यात जनावरांच्या खाण्यात घाणेरीसारखी वनस्पती आल्याने, त्यांना विषबाधा होत असते.
पावसाळ्यात सर्वत्र गवतवर्गीय वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते. चराऊ कुरणामध्ये घाणेरी, गुणगुणी या नावानी ओळखल्या जाणाऱ्या विषारी वनस्पती प्रामुख्याने आढळून येतात.
घाणेरीतील लेंटाडीन नावाचा विषारी घटक ही वनस्पती खाल्ल्यानंतर जनावरांच्या रक्तामध्ये येतो.
असे जनावर सूर्यप्रकाशात आल्यास त्यांना विषबाधेची लागण होत असते. या प्रकारच्या विषबाधेस प्रकाशसंवेदनशीलता असेही म्हटले जाते.
जनावरांच्या त्वचेचा जो भाग सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात येतो. त्या भागाला सूज येते. त्या भागाला खाज सुटायला लागते.
डोळ्याच्या बाजूचा भाग, कान, नाक आणि शेपटीला सूज आलेली दिसून येते.जनावरांच्या डोळ्यातील श्लेष्मपटलाचा रंग पिवळा पडतो.
पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बाधित जनावरांवर उपचार करून, ही जनावरे सावलीमध्येच बांधावीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.