Team Agrowon
आज मानवत (जि.परभणी) येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा 'भव्य एल्गार मोर्चा' तहसील कार्यालयावर धडकला.
यावेळी हजारो कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले. या विराट आज मोर्चाला संबोधित केले.
गेल्या अनेक दिवसांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन व पाठपुरावा सुरुच आहे.
परंतु दुर्दैवाने केंद्र सरकारने अद्यापही कापूस उत्पादकांच्या बाबतीत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
त्यामुळे तातडीने केंद्र सरकारने कापूस व सूत निर्यातीला प्रोत्साहन द्यावे व सोयापेंड निर्यातीचा निर्णय घ्यावा,
तसेच या परिसरातील कृषिपंपाची सक्तीची विजबिल वसुली थांबवून कनेक्शन कापणे थांबवावे, जर पुढील १०-१२ दिवसांत केंद्र सरकारने सोयाबीन-कापूस प्रश्नी ठोस निर्णय घेतला नाही, तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा पेटून उठतील व राज्यभर आंदोलनाचा आगडोंब उसळेल..! असा इशाराही देण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.