चासकमान धरण
चासकमान धरण 
मुख्य बातम्या

`चासकमान`मधील आवर्तन तब्बल ८९ दिवसांनंतर बंद

टीम अॅग्रोवन

चास, जि. पुणे  ः चासकमान (ता. खेड) धरणातून सोडण्यात आलेले खरिपाचे पहिले आवर्तन तब्बल ८९ दिवसांनंतर मंगळवारी (ता. १५) बंद करण्यात आले. धरणात १०० टक्के म्हणजेच ८.५३ टीएमसी पाणीसाठा आहे. 

चालू वर्षी जून महिन्यापासून पावसाने चांगली हजेरी लावली व संपूर्ण पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा शंभर टक्के राहिला. मागील काही वर्षांपेक्षा चालू वर्षी पावसाची स्थिती उत्तम राहिल्याने जुलै महिन्याच्या २८ तारखेला धरणाचे पाचही दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरवात झाली होती. मात्र चालू वर्षीही शिरूर तालुक्‍यात समाधानकारक पाऊस न झाल्याने जुलै महिन्याच्या १६ तारखेपासून कालव्याद्वारे खरिपासाठीचे आवर्तन सोडण्यास सुरवात झाली होती.

आवर्तन काही दिवसांचे असेल असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. पण शिरूर तालुक्‍यातील पाण्याची गरज पूर्ण होऊन सर्व पाझर तलाव, बंधारे भरल्यावरही आवर्तन अमर्यादपणे सुरूच राहिल्याने खेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांची कालव्यालगतची खरिपाची पिके मात्र कालवा गळतीने उद्‌ध्वस्त झाली. अतिरिक्त पाण्यामुळे पिकांची वाढ खुंटली, मुळे सडल्याने पिके नष्ट झाली. गेल्या काही वर्षांपासून चासकमान धरणाच्या पाण्याचे आवर्तन हे कधी पस्तीस दिवसांचे, कधी चाळीस दिवसांचे, कधी पंच्याहत्तर दिवसांचे, तर कधी तब्बल नव्वद दिवसांचे असे अमर्याद, नियोजनशून्यपणे सुरू असते. कालवा नियोजन समितीत आवर्तनाच्या तारखा ठरतात त्या फक्त कागदावरच असतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT