The water of other rivers except Panchganga is stagnant
The water of other rivers except Panchganga is stagnant 
मुख्य बातम्या

पंचगंगा वगळता अन्य नद्यांचे पाणी स्थिर

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा वगळता अन्य बहुतांशी नद्यांचे वाढणारे पाणी स्थिर झाले आहे. बुधवारी (ता. १९)  दिवसभर पाऊस कमी असल्याने पाटबंधारे विभाग येत्या दोन दिवसांत धरणातील पाणी सोडण्याचे प्रमाण आणखी कमी करण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावड्यात सर्वाधिक ६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग ५५ हजार वरून ३० हजार पर्यन्त कमी झाल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी स्थिर झाली. यामुळे कृष्णा काठच्या नागरिकांनी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे. १५ ऑगस्टला चांदोली (वारणा) धरणांतून सुरू असणारा १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग बुधवारी (ता. १९) सकाळी ९ हजारांवर आणण्यात आला. यामुळे वारणा नदीचे पाणी ही स्थिर झाले आहे.

राधानगरी धरणातून अद्याप ही दोन स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरू असल्याने भोगावती व पंचगगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच होती. राजाराम बंधाऱ्याजवळ बुधवारी (ता. १९) दुपारी बारा वाजता पंचगंगेची पाणी पातळी ४१ फूट ४ इंच इतकी होती. या ठिकाणी धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. अलमट्टी धरणांतून अडीच लाख क्युसेक विसर्ग कायम होता.

दूधगंगा धरणांतून ७००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दूधगंगा नदीच्या पाण्यात ही वाढ होती. पाऊस ओसरल्याने पाण्याखाली गेलेले बंधारे खुले होत आहेत. अन्य प्रकल्पातून ५०० ते १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत ७६ बंधारे पाण्याखाली होते. दरम्यान सावधगिरीचा उपाय म्हणून गेल्या वर्षी पुराचा मोठा फटका बसलेल्या चिखली (ता. करवीर) येथील चाळीस टक्के नागरिकांनी स्थलांतर केले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT