`आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न व्हावा`
`आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न व्हावा` 
मुख्य बातम्या

`आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न व्हावा`

टीम अॅग्रोवन

वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग :  कोकणातील आंबा उत्पादकांनी एकत्र येऊन आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचा उत्पादकांना फायदा होईल, असा आशावाद शेतकरी मेळाव्यात तज्ज्ञांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲग्रीकल्चर, सिंधुदुर्ग फार्मर प्रोड्यूसर कंपनीतर्फे फळ संशोधन केंद्रात शेतकरी मेळावा घेण्यात आला.

चांगल्या दर्जाच्या आंब्याचे उत्पादन करणे हे आव्हान बनले आहे. सेंद्रिय पद्धतीने त्याचे उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

यासाठी एकत्रित वयवस्थापन शेतकऱ्यापर्यंत जाणे महत्वाचे आहे. कोकणात अतिउच्च दर्जाचे वातावरण आंबा उत्पादनासाठी आहे. दर्जेदार आंबा उत्पादनासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञान यात समन्वय आवश्यक असल्याचे डॉ. बी एन. सावंत यांनी सांगितले.

एम. बी. दळवी यांनी आंबा उत्पादन करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली.

आंब्यावर हवामानाचा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रतिकूल परिणाम होत आहे. योग्य मार्गदर्शन नसल्याने आंबा उत्पादकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याचाच परिणाम आंब्याचा दर्जा व त्याच्या मार्केटिंग यावर होत आहे. कोकणवासीयांसाठी ही नक्कीच अडचणीची गोष्ट आहे. कृषी विभाग, उत्पादक, संशोधन केंद्रे यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आंबा उत्पादकांनी व्यक्त केली.

एकी निर्माण झाल्यास यातून चांगला संदेश उत्पादकांपर्यंत जाईल. त्याचा फायदा कोकणातील आंब्याला होऊ शकेल, असे डॉ. जे. एल. पाटील, बाळासाहेब परुळेकर, डॉ श्रीकृष्ण परब यांनी सांगितले. मिलिंद प्रभू यांनी स्वागत केले. आनंद करपे यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT