then ‘Swabhimani’ will take a violent turn
then ‘Swabhimani’ will take a violent turn 
मुख्य बातम्या

...तर ‘स्वाभिमानी’ हिंसक वळण घेईल

टीम अॅग्रोवन

नाशिक : कोरोना,अतिवृष्टी अन अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान वाढीव वीजबिले पाठवली. भांडवल नसल्याने सध्या शेतकरी ती भरू शकत नाही. सरकार मात्र बील वसुलीसाठी थेट वीज जोडण्या खंडित करत आहे. विजेअभावी पाणी देता येत नसल्याने पिके जळत आहेत. सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना हिंसक वळण घेईल, असा इशारा सरकारला देण्यात आला.

महावितरणकडून सध्या वीज जोडण्या खंडित करण्यात येत असल्याने संघटनेने आक्रमक होत शुक्रवार (ता.१९) चांदोरी (ता.निफाड) येथे रास्ता रोको केला.  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जनतेला कायमस्वरूपी वीजमाफी देऊ शकतात. तर महाराष्ट्र सरकार कोरोना काळातील वीज माफ करून शकत नाही? असा सवाल करण्यात आला. सरकारने मोगलाई व ब्रिटिश राजवटीसारखे जनतेला वेठीस धरू नये. अन्यथा, जनता तुम्हाला घरी पाठवेल. शेतकरी व जनतेचा अंत पाहू नका, अशी रोखठोक भूमिका आंदोलकांनी मांडली

आंदोलनानंतर महावितरणचे सहायक अभियंता विशाल मते, मनोज कातकाडे आदींना निवेदन देण्यात आले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस निवृत्ती गारे, विभागीय जिल्हाध्यक्ष राजू शिरसाट, ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद पगार,युवक जिल्हाध्यक्ष परशुराम शिंदे, रवींद्र शेवाळे, निफाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब तास कर, गजानन घोटेकर, राम राजोळे, सचिन कड, शंकर फुगट आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT