सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पिकांनी टाकल्या माना
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पिकांनी टाकल्या माना 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पिकांनी टाकल्या माना

टीम अॅग्रोवन

सांगली : खरिपाच्या प्रारंभी पडलेल्या पेरणी योग्य पावसामुळे जत तालुक्‍याच्या काही भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी केली. पण त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे खरीप हंगाम धोक्‍यात आला आहे. पिके माना टाकू लागली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. येत्या दोन - चार दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना उभ्या  पिकांत नांगर फिरवावा लागेल, अशी शक्यता आहे.

खरिपातील बाजरी, मूग, तूर इत्यादी पिके धोक्‍यात आली आहेत. ती जगवण्यासाठी पावसाची आवश्‍यकता आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाची रिमझिम झाली. त्यामुळे पिकांची वाढ झाली. पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी देवून पिके जगवली. परंतु आता पाणी संपल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. जमिनीतील ओलावा कमी होऊन पिके पिवळी पडली आहेत. 

तालुक्‍याची पावसाची वार्षिक सरासरी ४५७.७ मिलिमीटर आहे. आतापर्यंत १६८. ५० मिमी पाऊस झाला आहे. एप्रिलमध्ये ८.३८ , मे मध्ये १६.३८, जूनमध्ये ६९.६५, जुलै ६०.९४, तर पाच ऑगस्टपर्यंत १३.१६ मिलिमीटर पाऊस झाला. जून व जुलै महिन्यात एखादा-दुसरा अपवाद वगळता भुरभुरत्या पावसानेच सातत्याने हजेरी लावली. यामुळे केवळ पिके जगली. रिमझिम पाऊसही सर्वदूर नसल्याने हलक्‍या रानावरील पिके आता हातची जाऊ लागली आहेत. पिके अनेक रोगांना बळी पडत आहेत. त्यांच्यावरील फवारणीचा खर्च ही शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT