Preparations for sale of fruits, grains of farmers groups in Aurangabad
Preparations for sale of fruits, grains of farmers groups in Aurangabad 
मुख्य बातम्या

औरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य विक्रीची तयारी

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील शेतकरी गटांनी आपल्याकडील उत्पादित फळे भाजीपाला व धान्याची थेट ग्राहकांना विक्री करण्याची तयारी दाखवली आहे. या शेतकरी गटांना विक्रीसाठी वाहन परवाने मिळवून देण्यासाठी कृषी विभागानेही हालचाली गतिमान केल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य व देश पातळीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जीवनावश्यक शेतीमालाच्या विक्रीचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांकडे उत्पादित फळे भाजीपाला व धान्याच्या विक्रीत वाहतुकीसह इतर अडचणी येत असल्यास त्या प्राधान्याने सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

त्यानुसार औरंगाबाद उस्मानाबाद व इतर जिल्ह्यात कोणत्या गावातील कोणत्या शेतकरी गटाकडे कोणता भाजीपाला फळे व धान्य विक्रीसाठी उपलब्ध आहे ते कुठे विक्री करू इच्छितात याविषयीची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या माहिती संकलनाला औरंगाबाद जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, वैजापूर, कन्नड, गंगापूर, फुलंब्री, सिल्लोड, पैठण, सोयगाव, खुलताबाद आदी तालुक्यांतील जवळपास चाळीस गावांतील शेतकरी गटांनी त्यांच्याकडे नेमका कोणत्या प्रकारचा भाजीपाला फळे व धान्य उपलब्ध आहे याची माहिती कृषी विभागाकडे नोंदविले आहे. 

या माहितीच्या आधारे कृषी विभाग व आत्माच्या माध्यमातून संबंधित शेतकरी गट ज्या शहरात गावात वा भागात उत्पादित मालाची विक्री करू इच्छित असेल त्याविषयीचा वाहतूक परवाना आरटीओ कार्यालयाकडून मिळवून देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शेतकरी गटांकडून थेट ग्राहकांना फळे भाजीपाला व धान्य विक्रीचे काम सुरू झाल्यास एकाच ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.

माझ्या दहा एकरांतील टरबूज व दहा एकरातील टोमॅटो विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. गुरुवारी (ता. २६) कृषी विभागाशी संपर्क केल्यानंतर आरटीओ कार्यालयाकडून जवळपास तासाभरात मला वाहनाच्या वाहतुकीचा परवाना मिळाल्याने टरबूज व टोमॅटो विक्रीसाठी आवश्यक वाहतूक करण्याचा प्रश्न मार्गी लागला. - संतोष जाधव, शेतकरी हातनूर जी औरंगाबाद.

जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकरी गटांनी त्यांच्याकडे उत्पादित फळे भाजीपाला व धान्य  विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. या या माहितीला अनुसरून त्यांना अपेक्षित मदत व थेट विक्रीसाठी वाहतुकीचा परवाना देण्याचे काम सुरू आहे.  - डॉ तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT