बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडे
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडे 
मुख्य बातम्या

बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडे

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कमी, अनियमित पावसामुळे प्रकल्पांमध्ये अपेक्षित साठा न झाल्याने हे संकट निर्माण होण्याची स्थिती आहे. 

जिल्ह्यातील पाण्याच्या पातळीत सातत्याने घट होत आहे. खडकपूर्णा प्रकल्पासह कोराडी, मस या मध्यम प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के आहे. जिल्ह्यातील पाणी समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात ३१ गावांना ३० टँकरने पाणी पुरविले जात आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टँकरमध्ये या आठवडयात वाढ झाली. ज्या प्रकल्पांमध्ये पाणी आहे, त्यातील साठाही दिवाळीनंतर सातत्याने कमी होत आहे. 

सध्या बाष्पीभवनाचे प्रमाण कमी आहे. येत्या काळात उष्णता वाढल्यानंतर त्यात वाढ होईल. त्यामुळे पाणीसाठा वेगाने कमी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. पुढील सहा महिने काढण्यासाठी पाण्याचा पेच आहे. प्रामुख्याने घाटाखालील खारपाण पट्ट्यात पाणीटंचाईमुळे नागरिकांना अधिक त्रास झेलावा लागत आहे.  

अकोला, वाशीम टंचाईपासून दूर  

गेल्या वर्षी पाणीटंचाईशी लढा दिलेल्या अकोला जिल्ह्यात यंदा आतापर्यंत एकही टँकर सुरू नाही. मागील वर्षी या काळात ४१ टँकर सुरू होते. पाऊस चांगला होऊन प्रकल्प भरल्याने जिल्ह्यातील टंचाई बऱ्याच अशी कमी झाली. वाशीम जिल्ह्यातही पिण्याच्या पाण्याची समस्या फारशी नाही. याही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला होता. तिथेही कुठेच टँकरने पाणी पुरविण्याची वेळ आली नाही. बुलडाणा जिल्ह्यात जानेवारी २०१८ मध्ये दोन टँकर सुरू होते. आता ३० टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. अजून सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या काळात जिल्ह्यात टँकरची संख्या वाढवावी लागण्याची चिन्हे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT