मराठवाड्यात महायुतीचा करिष्मा कायम
मराठवाड्यात महायुतीचा करिष्मा कायम 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात महायुतीचा करिष्मा कायम

टीम अॅग्रोवन

नांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचा करिष्मा कायम राहिला आहे. काँग्रेसने नांदेड आणि हिंगोलीच्या जागा गमावल्या आहेत. औरंगाबादेत शिवसेनेच्या गडाला एमआयएमने सुरुंग लावला. 

गुरुवारी (ता.२३) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानयंत्रांतील मतमोजणीस सुरुवात झाली. औरंगाबाद वगळता अन्य सात मतदारसंघांत पहिल्या फेरीपासूनच महायुतीच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी अखरेच्या फेरीपर्यंत कायम राहिल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. बहुतांश मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसला. भाजपची एक जागा वाढली, तर शिवसेनेने एक जागा जिंकली, तर एक जागा गमावली.

काँग्रेसचा दोन्ही जागी पराभव

२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना राज्यात काँग्रेसला केवळ नांदेड आणि हिंगोलीच्या जागांवर विजय मिळाला होता. परंतु, यंदा या दोन्ही जागी काँग्रेसचा पराभव झाला. नांदेड मतदारसंघात काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात चुरशीची लढत झाली. चिखलीकर यांनी सुरुवातीच्या फे-यापासून घेतलेली २० हजारांहून अधिक मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांनी दीड लाखांवर मते मिळाली. 

हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना सुरुवातीच्या फे-यापासून पिछाडीवर टाकलेले होते. पाटील आणि वानखेडे यांच्यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक मताधिक्याचा फरक शेवटच्या कायम राहिला.

औरंगाबादमध्ये शिवसेनेला सुरुंग

औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील, अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या लढत झाली. काँग्रेसचे सुभाष झांबड चौथ्या स्थानांवर राहिले. सुरुवातीला जलील आणि जाधव यांच्यात आणि नंतर खैरे आणि जलील यांच्यात लढत झाली. जलील २२ हजार मतांनी आघाडीवर होते.

जालन्यात दानवे  जालना मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे विलास औताडे यांच्यात लढत झाली. अपेक्षेनुसार दानवे यांनी अडीच लाखांचे मताधिक्य घेतले होते.

परभणीत शिवसेनेचा बालेकिल्ला कायम, परंतु मताधिक्य घटले.... परभणी मतदारसंघात शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. शिवसेनेचे जाधव पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. मधल्या काही फे-यानंतर जाधव यांचे मताधिक्य कमी अधिक होत होते. जाधव २५ हजारांहून अधिक मताधिक्य होते. वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांनी एक लाखाहून अधिक मते घेतली. शिवसेनेचा परभणीचा बालेकिल्ला कायम राहिला, परंतु मताधिक्यात मोठी घट झाली. 

बीडमध्ये मुंडे यांचा करिष्मा.....

बीड मतदारसंघात खासदार प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली. प्रीतम मुंडे यांनी १ लाख ३० हजार मतांची आघाडी घेतली होती.

उस्मानाबादचा गड शिवसेनेने राखला....

उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह यांच्यामध्ये लढत झाली. निंबाळकर यांनी सुरुवातीला घेतलेली आघाडी कायम ठेवली. निंबाळकर यांनी १ लाख १३ हजारांचे मताधिक्य घेतले होते.

लातूरमध्ये भाजपला यश

लातूर मतदारसंघात भाजपचे सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांच्यात लढत झाली. शृंगारे यांना १ लाख ९० हजारांचे मताधिक्य होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT