कोल्हापूर : कर्जमाफी होऊनसुद्धा जिल्हा बँकेची वसुली !
कोल्हापूर : कर्जमाफी होऊनसुद्धा जिल्हा बँकेची वसुली ! 
मुख्य बातम्या

कोल्हापूर : कर्जमाफी होऊनसुद्धा जिल्हा बँकेची वसुली !

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या २००८ च्या कर्जमाफीअंतर्गत सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली आहे. तरीही जिल्हा बँकेकडून वसुली सुरू आहे ती थांबवावी अशी, मागणी शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १३) येथे केली. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास ४५ हजार शेतकरी या कर्जमाफीपासून अद्याप वंचित आहेत. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी हायकोर्ट मुंबई येथे रिट दाखल करून दाद मागितली होती, त्याची सुनावणी होऊन ते सर्व शेतकरी कर्जमाफीस पात्र झाले आहेत. तरीही जिल्हा मध्यवर्ती बँकेने कोर्टाच्या आदेशाला कचऱ्याची पेटी दाखवत त्यांची कर्ज वसुली सुरू ठेवली आहे. हा कोर्टाचा अवमान आहे ही अन्यायकारक वसुली थांबवावी व हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार संबंधितांना कर्ज मंजुरी द्यावी, यासाठी म्हाडा पुणे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १३) बँक प्रशासनास निवेदन दिले. श्री घाटगे म्हणाले, केडीडीसी बँकेच्या बोर्डाने कोर्टाचे आदेश पाहून ४५ हजार शेतकऱ्यांच्या प्रश्नाला योग्य तो न्याय द्यावा. या वेळी हमीदवाडा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबगोंडा पाटील, शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कागल बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, बिद्री कारखाना संचालक बाबासाहेब पाटील, संजय पाटील, बॉबी माने, प्रताप पाटील, उत्तम पाटील यांसह शेतकरी उपस्थित होते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT