Licenses of 64 factories were withheld due to non-issuance of FRP
Licenses of 64 factories were withheld due to non-issuance of FRP 
मुख्य बातम्या

‘एफआरपी’ न दिल्याने ६४ कारखान्यांचे परवाने रोखले

टीम अॅग्रोवन

पुणे ः शेतकऱ्यांना गेल्या गाळप हंगामातील रास्त व किफायतशीर दरानुसार (एफआरपी) अद्यापही पूर्ण रकमा न दिल्याने राज्यातील ६४ साखर कारखान्यांना यंदाचा गाळप परवाने मंजूर करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

गाळप परवाना देण्यात आलेल्या कारखान्यांपैकी २५ ऑक्टोबरअखेर २७ काराखान्यांनी धुराडी पेटवली होती. त्यात १४ सहकारी, तर खासगी मालकीच्या १३ कारखान्यांचा समावेश आहे. सहकारी व खासगी अशा दोन्ही गटातील कारखान्यांनी आतापर्यंत ६ लाख टनांपेक्षा जास्त ऊसखरेदी केली आहे. त्याचे गाळप केल्यानंतर तीन लाख ८६ हजार क्विंटल साखर तयार झाली. उतारा मात्र सध्या अवघा ६.३४ टक्के आहे.

गाळपात सध्या कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. तेथे सव्वा दोन लाख टन तर पुणे व सोलापूर विभागातील कारखान्यांनी प्रत्येक पावणे दोन लाख टनापेक्षा जास्त ऊस गाळला आहे.

साखर आयुक्तालयातील सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी सांगितले की, ‘‘राज्याच्या गाळप हंगामात चांगल्या स्थितीत सुरू झालेला आहे. आतापर्यंत आयुक्तालयाने गाळपासाठी १३० कारखान्यांना मंजूर केले आहेत. मात्र, ६४ कारखान्यांना अद्याप परवाने देण्यात आलेले नाहीत. या कारखान्यांकडून थकीत एफआरपी चुकती होत जाईल, त्यानुसार तत्काळ परवाने दिले जातील.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT