In Kolhapur, the panchnama of loss is fast
In Kolhapur, the panchnama of loss is fast 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगात

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील भात, भुईमूग, सोयाबीन व उसाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेगात करण्याचे काम कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार १० ते १६ ऑक्‍टोबर दरम्यान, तब्बल ३ हजार ३३६ हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २४ हजार ९५१ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. गेल्या आठवड्यापासून परतीसह वादळी पावसानेही झोडपून काढले. जिल्ह्यात ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. अशा सर्व शेतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तहसीलदार, सर्कल, तलाठी व ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांकडून पंचनामे केले जात आहेत.

जिल्ह्यात चंदगड तालुक्‍यात सर्वाधिक १२०० हेक्‍टर क्षेत्राचे आणि १३ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, करवीर, राधानगरी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज तालुक्‍यातही भात, सोयाबीन व ऊस जमीनदोस्त झाला आहे.आठवड्यापासून झालेल्या अतिवृष्टी तर काही ठिकाणच्या मुसळधार पावसाने पिकांना पाण्याखाली घेतले. कापणी व मळणीसाठी परिपक्व भात आणि सोयाबीनचा चिखल झाला. शासनाकडून याचे पंचनामे केले जात आहे. चंदगड, राधानगरी, करवीर तालुक्‍यात अनेक ठिकाणी भात पीक साचलेल्या पाण्यामध्येच गळून पडले आहे. हीच परिस्थिती सोयाबीन आणि भुईमुगाचीही आहे. अजूनही पंचनामे सुरू असून नुकसानीची आकडा वाढणार आहे.

जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. युद्धपातळीवर आम्ही प्रत्येक गावामध्ये पंचनामे करीत आहोत. आत्तापर्यंत झालेल्या पंचनाम्यात सर्व पिकांचे ३३३६ हेक्‍टरवरील नुकसान दिसून येत आहे. अजूनही पंचनामे केले जात आहे. त्यामुळे, आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Export Ban : न्यायालयाने दिला तांदूळ निर्यातदारांच्या बाजूने निर्णय; केंद्र सरकारला सुनावले!

Mango Festival : कोल्हापूर, सांगलीत ‘आंबा महोत्सव’

Indian Spices Product Ban : आधी हाँगकाँग-सिंगापूर आणि आता शेजारच्या देशाने घातली भारतीय मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण

Panjab Stubble Burning : पंजाबमध्ये गव्हाचे अवशेष जाण्यावर भर; जम्मू-काश्मीरच्या राजौरीत जंगलास आग

SCROLL FOR NEXT