Implement 'Jaljivan' effectively: Pawar
Implement 'Jaljivan' effectively: Pawar 
मुख्य बातम्या

‘जलजीवन’ची प्रभावी अंमलबजावणी करा : पवार

टीम अॅग्रोवन

पुणे ः ‘‘उन्हाची तीव्रता वाढत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करा,’’ असे निर्देश उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

विधानभवन येथील कौन्सिल हॉल येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘जलजीवन मिशन’, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत जिल्ह्याच्या संपूर्ण प्रारूप आराखड्याबाबत बैठक झाली. या वेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘पाण्याची गरज असलेल्या प्रत्येक  गावांमध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद प्रत्येक उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. कुठेही अडचण उद्भवता कामा नये. सर्व ठिकाणी पाणीपुरवठा नियमित व्हावा.’’ 

बापट म्हणाले, ‘‘पाण्याचे गावनिहाय नियोजन होणे आवश्यक आहे. पाणी वितरण व्यवस्था व्यवस्थित व्हावी. ’’  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT