द्राक्ष निर्यात
द्राक्ष निर्यात  
मुख्य बातम्या

द्राक्षाला निर्यातीची गोडी

टीम अॅग्रोवन

मुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर दुष्काळ आणि थंडीचा परिणाम झाला असला तरीही निर्यातीत मात्र आशादायक चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असून भारतीय द्राक्षाने आपली ‘गोड’ ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या हंगामात प्रथम भारतीय द्राक्षाने दोन लाख टन निर्यातीचा विक्रमी टप्पा पार करून दोन लाख १५ हजार टनांपर्यंत मजल मारली आहे. निर्यातीचे हे चित्र देशातील द्राक्ष उत्पादक आणि व्यापारी यांच्यासाठी दिलासादायक आहे.  देशातील २०१८-१९ चा द्राक्ष हंगाम सुरू झाल्यानंतर सुरवातीला दुष्काळ आणि जानेवारी महिन्यापासून थंडीमुळे संकट आले. त्यामुळे द्राक्ष निर्यातीच्या मापदंडाचे पालन करण्याचे मोठे आव्हान उत्पादकांसमोर होते. परंतु, द्राक्ष उत्पादकांनी संकटाची मालिक पार करत निर्यातीत विक्रम केला आहे. कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०१६-१७ च्या हंगामात एक लाख ९८ हजार ४७१ टन द्राक्ष निर्यात झाली होती. गेल्या हंगामात मात्र निर्यातात घट होऊन एक लाख ८८ हजार २२१ टन द्राक्ष निर्यात झाली होती. यंदाच्या हंगामाची सुरवातच संकटांनी झाल्याने निर्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी होण्याची भीती होती. चीनमध्येही यंदा द्राक्ष निर्यात वाढली आहे. २०१७-१८ च्या हंगामात ६०७ टन द्राक्ष निर्यात झाली होती. यंदा मात्र दोन हजार २५० टन झाली आहे. तसेच आॅस्ट्रेलियामध्ये निर्यात वाढली आहे. आॅस्ट्रलियातील निर्यात ११ टक्क्यांनी वाढून ३१ हजार १८२ टन झाली आहे. या दोन्ही देशात झालेली निर्यात वाढ निर्यातीच्या दृष्टीने आशादायक आहे. चीनचीही पसंती भारताची द्राक्ष निर्यात युरोपीयन देशांमध्ये जास्त होत असली तरीही चीनमध्ये कमीच निर्यात व्हायची. २०१७-१८ च्या हंगामात भारतातून केवळ ६०७ टन द्राक्ष निर्यात झाली होती. यंदा मात्र चीनमधील निर्यात दुपटीपेक्षाही अधीक वाढून दोन हजार २५० टन झाली आहे. यंदा भारतीय द्राक्ष चीनच्या ग्राहकांच्याही पसंतीस उतरले आहे. त्यामुळे निर्यातीसाठी चीन ही एक मोठी बाजारपेठ काबीज करण्याची संधी आहे.    शेतकऱ्यांचे योग्य नियोजन भारतीय द्राक्षाला विदेशात मागणी वाढली याचे मुख्य कारण म्हणजे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे काटेकोर नियोजन. एका निर्यात कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय द्राक्ष उत्पादकांनी यंदा काटेकोर कीटकनाशक व्यवस्थापन केले आहे. उत्पादकांनी योग्य नियोजनातून किटकनाशक अवशेष नियंत्रणात ठेवले आहे. अपेडाचे आर. रवींद्र म्हणाले की, द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रात यंदा घातक हवामान असतानाही शेतकऱ्यांनी निर्यातक्षम उत्पादन जास्त घेतले आहे. त्यामुळे निर्यात वाढली आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT