संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

अमरावती विभागातील तीन लाख शेतकऱ्यांनीच उतरविला पीकविमा

टीम अॅग्रोवन

अमरावती  : यंदाच्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम व अकोला या पाच जिल्ह्यांतील तीन लाख १५ हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीकविमा उतरविला असून, अजूनही अनेक शेतकरी ‘वेटिंग’वर आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी असे दोन घटक केले आहे. यंदा कर्जदार शेतकऱ्यांना ३१ जुलै तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना २४ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. मात्र, सर्व्हरच्या अडचणीमुळे पाच जिल्ह्यांतील केवळ तीन लाख १३ हजार शेतकऱ्यांनाच विम्यासाठी अर्ज करता आले. सर्व्हर डाऊन असल्याने शेतकऱ्यांना पीकविमाकरिता अर्ज दाखल करता आला नसल्याने आता बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असले तरी अमरावती विभागातील बुलडाणा वगळता इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले नाहीत. सर्व्हरमुळे आलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

अमरावती विभागातील सर्वच जिल्ह्यात सर्व्हर डाऊनची समस्या कायम होती. विमा काढण्याची शेतकऱ्यांची इच्छा असली तरी सरकारची मात्र तो काढू न देण्याची इच्छा असल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते मनिष जाधव यांनी व्यक्‍त केली.

शेतकऱ्यांनी विमा काढण्यासाठी रांगा लावल्या असताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे तासनतास त्यांना यासाठी ताटकळत राहावे लागत आहे. बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यांत याविषयी सर्वाधिक तक्रारी आहेत.  

बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी उतरविलेला विमा
बुलडाणा १.६० लाख
यवतमाळ  ५२ हजार
अमरावती २० हजार
अकोला ३५ हजार
वाशीम   ४६ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातीस परवानगीची घोषणा फसवीच

Sugar Market : दर नियंत्रणासाठी साखरविक्री कोटावाढीचा केंद्राचा सपाटा

Hapus Mango Export : रत्नागिरीतून एक टन हापूस लेबनानला रवाना

Heat Wave : कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

SCROLL FOR NEXT