ढगाळ हवामानाने द्राक्षउत्पादक चिंताग्रस्त
ढगाळ हवामानाने द्राक्षउत्पादक चिंताग्रस्त 
मुख्य बातम्या

ढगाळ हवामानाने द्राक्षउत्पादक चिंताग्रस्त

टीम अॅग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्‍या सरींमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात एक लाख २० हजार एकरांवर द्राक्षबाग आहे. त्यातील ३० टक्के बागा अवकाळी पावसामुळे खराब झाल्या आहेत. यंदाच्या हंदामात ३५-४० टक्के द्राक्ष बागांची विक्री झालेली आहे; तर उर्वरित ३५ टक्के बागांवरील द्राक्षाची विक्री शिल्लक आहे. जिल्ह्यातील हंगाम मार्चअखेर लांबण्याची शक्‍यता आहे. खराब हवामानामुळे फळछाटण्या विलंबाने घेतल्या आहेत.  ढगाळ हवामानामुळे द्राक्षांत भुरी व मण्याला तडा जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यंदा विविध प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या द्राक्षाच्या पेटीला सरासरी दर १७० ते १८० रुपये मिळतो आहे. शेतकऱ्याची कोंडी करून गुंतवलेल्या रकमेएवढाही पैसा त्यांच्या पदरात पडू दिला जात नाही. चांगल्या दर्जाच्या मालही कमी दराने खरेदी केला जातो आहे. खराब मालाला यापेक्षा कमी दर मिळत असल्याचे सध्याचे चित्र आहे. पुढील पाच-सहा दिवस ढगाळ हवामान आणि वातावरणात बदल राहण्याचा अंदाज आहे. बदलत्या वातावरणामुळे हंगामाच्या सुरवातीपासून द्राक्ष शेती अडचणीत आहे. थंडीत दर कमी होते. सध्याच्या ढगाळ हवामानात पुन्हा दलालांकडून दर पाडले जात आहेत. उत्पादन खर्चाचा ताळमेळही जमत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. - सुभाष आर्वे, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT