मिरची तोडणी
मिरची तोडणी 
मुख्य बातम्या

मिरची पीक अंतिम टप्प्यात

टीम अॅग्रोवन

नंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार म्हणून ओळख असलेल्या नंदुरबारमधील मिरची पिकातील काढणी जवळपास आटोपली आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईमुळे मागील महिन्यातच पीक काढून फेकण्याची वेळ आली होती.  सुमारे तीन हजार हेक्‍टरवर मिरचीची लागवड जिल्ह्यात मागील जून महिन्यात झाली होती. ऑगस्टपासून काढणी सुरू झाली. या हंगामात सुरवातीला अनुकूल वातावरण राहिल्याने काढणी बऱ्यापैकी झाली. नंतर पावसाने पाठ दिल्याने आवर्षणप्रवण भागात पीक संकटात  सापडले. नंदुरबार तालुक्‍यातील कोठली, पळाशी, कोळदे, लहान शहादे, बामडोद, धमडाई, पथराई, शिंदे, पाचोराबारी आदी ३२ गावांमध्ये जलसंकट वाढल्याने जानेवारीतच पीक काढून फेकण्याची वेळ आली.

कमी पाण्यामुळे पिकातील प्रतिकारक्षमता कमी झाली. भुरी रोगाचा फैलाव जानेवारीत दिसून आला होता, अशी माहिती कोळदा (जि. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातून मिळाली. सद्यःस्थितीत पीक जवळपास संपले आहे. ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे, त्यांच्याच मिरची पिकात काढणी सुरू आहे. परंतु मोजक्‍याच शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी आहे. नंदुरबार बाजारातील ओल्या लाल मिरचीचे दर यामुळे स्थिर असून, ते २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. जानेवारीच्या अखेरपर्यंत रोजची ५५ ते ६० ट्रॅक्‍टर (एक ट्रॅक्‍टर १५ क्विंटल क्षमता) मिरचीची आवक होत होती. परंतु, सध्या ही आवक रोजची १८ ते २० ट्रॅक्‍टरपर्यंत आहे.  प्रतिक्रिया आमच्या भागातील मिरची पीक पाण्याच्या समस्येमुळे पूर्णतः संपले आहे. ओल्या लाल मिरचीची आवकही घटली आहे. फक्त गुजरातमधील काही गावांमधून ओली लाल व हिरवी मिरची बाजारात येत आहे.  - प्रणील पाटील,  शेतकरी, पळाशी, जि. नंदुरबार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT