काटेमाठ खाल्ल्याने पाच जनावरे मृत्युमुखी
काटेमाठ खाल्ल्याने पाच जनावरे मृत्युमुखी 
मुख्य बातम्या

काटेमाठ खाल्ल्याने पाच जनावरे मृत्युमुखी

टीम अॅग्रोवन

कोपरगाव, जि. नगर  : बांधावरच्या गवतात काटेमाठ वनस्पती खाण्यात आल्याने पाच जनावरे मृत्युमुखी पडल्याची घटना टाकळी येथे घडली. या दुर्घटनेत चार जनावरांना वाचविण्यास पशुचिकित्सकांना यश आले.

टाकळी येथील उद्धव शशिकांत जाधव यांच्याकडील नऊ गायींना बांधावरील गवतात आलेल्या काटेमाट वनस्पतीतील विषारी अंशामुळे विषबाधा झाली. यावर तत्काळ उपचार सुरू केले, मात्र चार कालवडी आणि एक गाय वाचविणे शक्य झाले नाही. सुमारे साडेपाच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर दुर्घटनाग्रस्त चार गायींना डॉ. अच्युत कडलग आणि डॉ. नागरे यांनी वाचविले. 

काटेमाठ वजा वनस्पतींच्या खोड आणि मुळांमध्ये नायट्रेटचे प्रमाण असते. या वनस्पती खाण्यात आल्यानंतर जनावरे दगावतात. पाच जनावरे दगावल्यामुळे श्री. जाधव यांचे यामुळे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. तलाठी ना. रा. जावळे यांनी पंचनामा केला असून, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. डी. पी. दहे यांनी खाण्यात आलेल्या वनस्पतीतील विषारी घटकांमुळे गायींचा मृत्यू झाल्याचा दाखला दिला आहे.

सरकारने विषबाधेमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या जनावरांच्या पालकांना नुकसानभरपाईची तरतूद करावी, अशी मागणी श्री. जाधव यांच्यासह अमोल देवकर, निरंजन देवकर, चेतन देवकर, मनोज देवकर, अमरिश देवकर, प्रल्हाद देवकर आणि आर. एच. देवकर यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT