Sugar Factory
Sugar Factory  
मुख्य बातम्या

सव्वाचार लाख टन उसाचे राज्यात गाळप

टीम अॅग्रोवन

नगर ः यंदा राज्यात आतापर्यंत खासगी व सहकारी मिळून १७९ साखर कारखान्यांकडून सुमारे चार कोटी वीस लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. आतापर्यंत तीन कोटी ९९ क्विटंल साखरेचे उत्पादन झाले आहे. आतापर्यंत सोलापूरमधील विठ्ठलराव शिंदे व कोल्हापूरमधील जवाहर कारखान्याने सर्वाधिक उसाचे गाळप केले आहे.   आतापर्यंत राज्यात सहकारी साखर कारखान्यांकडून २ कोटी २४ लाख ९० हजार टन तर खासगी कारखान्यांकडून १ कोटी ९५ लाख ५० हजार टन उसाचे गाळप झाले आहे. माढा येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने शुक्रवारपर्यंत ८ लाख  ३२ हजार १८७ टन गाळप करून सात लाख ४४ हजार शंभर क्विंटल साखरेचे उत्पादन केले. कोल्हापुरातील जवाहर कारखान्याने ७ लाख ६ हजार ४०० टनांचे गाळप केले आहे. राज्यात सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी उतारा ९.८१ टक्के, तर खासगी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.०८ आहे. कोल्हापूर, पुणे विभाग ऊसगाळपासोबत उताऱ्यातही पुढे आहे. कोल्हापूर विभागाचा सरासरी साखर उतारा ११.०३ टक्के, तर पुणे विभागाचा सरासरी साखर उतारा ९.०९ टक्के आहे. नागपूर विभागाचा साखर उतारा सर्वांत कमी आहे.

विभागनिहाय ऊसगाळप आणि साखर उत्पादन  गाळप (लाख टनांत), उत्पादन (लाख क्विंटल) 

नगर  ६३.३ ५४.७४
कोल्हापूर ९६.८६ १०६.७९ 
औरंगाबाद  ३५.२४ २९.८  
सोलापूर ९३.८१ ८१.९३
पुणे  ९३.५९ ९२.६१
नांदेड ३३.६० ३०.३
अमरावती ३.१९ २.५८ 
नागपूर १.२ ०.८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT