sugarcane_1.jpg
sugarcane_1.jpg 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटील

टीम अॅग्रोवन

कऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपीसह ६०० रुपये द्यावेत, या मागणीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेला पाठिंबा मिळत आहे. साखर कारखानदारांना वठणीवर आणायचे असेल, तर शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेऊ नये, असे आवाहन बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी येथे केले.

एकरकमी एफआरपीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेचे तहसीलदार कार्यालयासमोर तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेत ते मंगळवारी बोलत होते. प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, ‘‘या आंदोलनालास विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दररोज शेतकरी समर्थन देत आहेत. साखरेचे दर वाढले. मात्र उसाचे दर वाढले नाहीत. आंदोलनाचा इतिहास कारखानदारांना, प्रशासनाला माहिती आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन प्रशासनाने कार्यवाही करावी. प्रशासनाने आंदोलनाची वेळ आणून देऊ नये. आम्ही अजूनही शांततेने आंदोलन करत आहोत. शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. साखर कारखानदारांना वठणीवर आणायचे असेल तर शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेऊ नये. कारखानदार दोनच दिवसांत ऊसदराचा निर्णय घेतील.’’

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांचे कारखाने आहेत. मंत्र्यांना कायद्याचा विसर पडला आहे. तो कायदा कसा असतो, ते दाखवून देण्याची धमक बळिराजा शेतकरी संघटनेत आहे.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT