13,000 farmers await debt relief in Khandesh
13,000 farmers await debt relief in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात कर्जमुक्तीची १३ हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात सुमारे १३ हजार शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही. यातील अनेक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून अपलोड झालेली माहिती ग्राह्य न धरली गेल्याने या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. 

खानदेशात सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. नंतर कोरोना व इतर संकटे आली. या योजनेची कार्यवाही संथ झाली. निधीची अडचण, तांत्रिक अडचण आदी कारणे बँका शेतकऱ्यांना सांगत आहेत. कर्जाची, पात्र असल्याची माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड केली आहे. परंतु ती स्वीकारली जात नसल्याने कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळत नसल्याचे बँकांचे म्हणणे आहे. 

अपलोड केलेली माहिती राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणेकडून स्वीकारली जाते. त्यानंतर शासनाकडून संबंधित कर्जदार शेतकऱ्याच्या बँक खात्यांत कर्जाचा निधी जमा केला जातो. यानंतर संबंधित शेतकरी कर्जमुक्त होतो. जळगाव जिल्ह्यात सुमारे सात हजार व धुळे, नंदुरबारात सुमारे सहा हजार शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. 

नियमित कर्जदारही अनुदानासापून वंचित 

सुमारे एक लाख नियमित कर्जदार शेतकरी ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. जे शेतकरी पात्र असून, यादीत नाव असूनही, काही कारणांनी कर्जमुक्त झालेले नाहीत, त्यांना नव्याने पीककर्ज मिळत नसल्याची स्थिती आहे. बँकाही कर्जमुक्तीचे पत्र (बेबाकी दाखला) देत नाहीत. यामुळे संबंधित शेतकऱ्यांची अधिकची अडचण होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT