बागेतील झाडांना लगडलेली फळे.
बागेतील झाडांना लगडलेली फळे. 
कृषी सल्ला

शेतकरी नियोजन पीक : केसर आंबा

Santosh Munde

माझी जवळपास सहा एकर क्षेत्रावर केसर आंबा बाग आहे. या बागेत १५ वर्षांपूर्वी लागवड केलेली ३ एकर, १० वर्षांपूर्वीची दीड एकर व ७ वर्षांपूर्वी लागवड केलेली दीड एकरावरील केसर आंब्याची झाडे आहेत. सुरुवातीपासूनच झाडांची, फळांची निगा राखताना नैसर्गिक साधनांचा परिणामकारक वापर करण्याबाबत कायम दक्ष असतो. शेतकरी :  पृथ्वीराज हरिभाऊ तत्तापुरे गाव :  शिवनी बु., ता. औसा, जि. लातूर एकूण क्षेत्र :  १० एकर. केसर आंबा क्षेत्र :  ६ एकर (१००० झाडे). शिवनी बु. (ता. औसा) येथे माझी १० एकर शेती आहे. जवळपास सहा एकर क्षेत्रावर केसर आंबा बाग आहे. या बागेत १५ वर्षांपूर्वी लागवड केलेली ३ एकर, १० वर्षांपूर्वीची दीड एकर व ७ वर्षांपूर्वी लागवड केलेली दीड एकरावरील केसर आंब्याची झाडे आहेत. सुरुवातीपासूनच झाडांची, फळांची निगा राखताना नैसर्गिक साधनांचा परिणामकारक वापर करण्याबाबत कायम दक्ष असतो. दरवर्षी बाजारात आंब्याला चांगले दर मिळतात. उत्पादनात चढ-उतार असली, तरी किमान शाश्‍वत उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न असतो. तसेच बागेमध्ये हापूस, मलगोबा, रत्ना, तोतापुरी, बत्ताशा, केळ्या आदी २० जातींच्या आंबा झाडांची लागवड केली आहे. यंदाचे नियोजन 

  • मागील हंगाम संपल्यानंतर जूनमध्ये थोडी छाटणी केली. झाडाच्या वाळलेल्या फांद्या काढून घेतल्या.
  • दोन झाडांमधील मोकळ्या जागेत एकरी २०० किलो घन जिवामृत दिले.
  • घन जिवामृत देताना ते झाडाच्या बुडापासून योग्य अंतरावर दिले. झाडांच्या खोडांना लागणार नाही याची काळजी घेण्यात आली.
  • प्रत्येक महिन्याला जिवामृताची फवारणी घेतली.
  • ऑक्टोबर आणि फेब्रुवारीमध्ये झाडाच्या बुंध्याला नीम पेस्ट लावली. याच कालावधीत बाग ताणावर सोडली होती.
  • यंदा डिसेंबर व जानेवारी अशा दोन टप्प्यांत आंब्याला मोहोर आला.
  • मोहोर संरक्षणासाठी जिवामृताची फवारणी करण्यात आली.
  • जानेवारीमध्ये बागेचा ताण तोडून पाणी देणे सुरू केले.
  • पाणी देताना दोन झाडांच्या मधील जागेत मोकळे पाणी देण्यात आले.
  • पंधरवड्यातून एकदा मोकळ्या पद्धतीने पाणी देण्यात आले.
  • पुढील नियोजन

  • सद्यःस्थितीत बागेतील काही झाडांना २५ ग्रॅम, ५० ग्रॅम, १०० ग्रॅमची फळे लगडलेली आहेत.
  • बागेतील फळे एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी तयार होतील. 
  • फळे तोडताना एक ते दोन इंच देठासहित तोडली जातात.
  • देठासहित फळ तोडल्याने फळांची टिकण्याची क्षमता, गोडी व सुगंध वाढतो असा माझा अनुभव आहे.
  • वर्षाला साधारणपणे ५ लाख रुपयांपर्यंत सरासरी उत्पन्न मिळते.
  • - पृथ्वीराज तत्तापुरे, ९५६१५६३५३७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT