कदम यांनी तयार झालेल्या आंब्यांची काढणी करून बाजारपेठेमध्ये पाठविण्यास सुरवात केली आहे
कदम यांनी तयार झालेल्या आंब्यांची काढणी करून बाजारपेठेमध्ये पाठविण्यास सुरवात केली आहे 
कृषी सल्ला

शेतकरी नियोजन पीक : हापूस आंबा

राजेश कळंबटे

सध्या काही झाडांवर फळधारणा होण्यास, तर काही झाडांवर आंबा तयार होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या काही झाडांवरील आंबे तयार झाले आहेत. त्यांची काढणी करून बाजारपेठेमध्ये पाठविण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पाऊस, वाढलेला उष्मा यापासून मोहोर आणि कैरीची जपणूक करण्यासाठी मागील वीस दिवसांपासून नियोजन व कामांना सुरुवात केली आहे. शेतकरी:  राजेंद्र मोतीराम कदम गाव :  मजगाव, ता. रत्नागिरी आंबा क्षेत्र :  ५० एकर  झाडे :  ३ हजार झाडे माझी ५० एकरांची आंबा बाग आहे. त्यामध्ये साधारणपणे ३ हजारांहून अधिक झाडे आहेत. जानेवारी, फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत झाडांना मोहोर आला आहे. सध्या काही झाडांवर फळधारणा होण्यास, तर काही झाडांवर आंबा तयार होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या काही झाडांवरील आंबे तयार झाले आहेत. त्यांची काढणी करून बाजारपेठेमध्ये पाठविण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पाऊस, वाढलेला उष्मा यापासून मोहोर आणि कैरीची जपणूक करण्यासाठी मागील वीस दिवसांपासून नियोजन व कामांना सुरुवात केली आहे. यंदाचे नियोजन 

  • यंदा पावसाळा लांबल्यामुळे पालवी उशिराने आली. परिणामी, ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवला नाही. याच कालावधीत ढगाळ वातावरण असल्याने पालवीवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. त्यासाठी  तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार फवारणी केली. 
  • अनियमित वातावरणामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यामुळे दर १० ते १५ दिवसांनी रोग नियंत्रणाच्या दृष्टीने फवारणी करावी लागत होती. 
  • जानेवारी महिन्यात आलेल्या फुलोऱ्याला फळधारणा होण्यासाठी झाडांची हलवणी करण्यात आली. यामुळे सुकलेला मोहोर पडून गेला.
  • मोसमी पाऊस, थंडी, उष्णता आणि अवकाळी पावसामुळे झाडांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला. 
  • आंबा मोहोरावर आणि पानांवर तुडतुडे ही कीड आणि बुरशीजन्य रोग, करपा यांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागांमध्ये १५ दिवसांच्या अंतराने शिफारशीप्रमाणे फवारणीचे नियोजन केले होते. 
  • पहिल्या टप्प्यातील मोहोराला फळधारणा झाली असून त्यामधून वीस टक्के उत्पादन मिळेल. 
  • पुढील २० दिवसांचे नियोजन

  •  काही मोहोराला अजूनही फळधारणा झालेली नाही. त्यांच्यासाठी येत्या ८ दिवसांत बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येईल. त्यानंतर मोहोर जुना झाल्यावर पुन्हा झाडांची हलवणी करण्यात येईल.
  •  सध्या फळे अंड्याच्या आकाराची आहेत. त्यावर डाग पडणे, तुडतुडे आणि फुलकिडींचा प्रादुर्भाव होऊन फळे खराब होण्याची शक्यता आहे.  या किडीपासून संरक्षण करण्यासाठी फवारणी करण्याचे नियोजन आहे.
  •  सध्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे झाडांना पुरेसे पाणी देणार आहे. विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रति झाड २०० लिटर पाणी दिले जाते.
  •  सध्या काही झाडांवरील फळे तयार झाले असून, पेटी भरण्याची कामेही सुरू आहे. दर्जेदार आंबा बाजारात जावा यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी झाडावर तयार झालेलाच आंब्याची काढणी करत आहे. काढणीनंतर आंबा व्यवस्थित पाण्याने पुसून घेतला जातो. जेणेकरून त्यावर कोणतेही डाग राहणार नाहीत. वजन करून पेटीत भरला जातो. 
  • - राजेंद्र कदम, ९४२२४ ३३१३३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT