पेरू प्रक्रियेतून वाढवा फायदा
पेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. अशा पदार्थांना बाजारात चांगली मागणीही आहे. पेरूपासून जॅम, जेली, सरबत, सिरप, टॉफी, चीज, नेक्टर, पेरूशेक, पेरूखंड असे मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. पेरू हे फळ थंड पित्तशामक, रुचिकारक व बुद्धिवर्धक आहे. प्रति ग्रॅम पेरु फळामध्ये पाणी ८१.७७ टक्के, कर्बोदके ११.२३ टक्के, प्रथिने ०.९ टक्के, तंतुमय पदार्थ ५.५ टक्के, खनिजे ०.७ टक्के, क जीवनसत्त्व २१३ मिली ग्रॅम, कॅल्शियम ६० मि.ग्रॅ., फॉस्फरस २० मिलीग्रॅंम इ. घटक असतात. प्रक्रियायुक्त पदार्थ १) जेली
जेली तयार करण्यासाठी पेक्टिन अत्यावश्यक घटक असून, कच्च्या ते मध्यम पिकलेल्या फळामध्ये या घटकाचे प्रमाण अधिक असते.फळे स्वच्छ धुऊन त्यावरील साल काढून टाकावी. फळाचे बारीक काप करून त्यामध्ये त्याच्या वजनाच्या दीड पट पाणी मिसळून मिश्रण २५ ते ३० मिनिट उकळावे. त्यानंतर मिश्रण गाळून घेऊन गाळलेल्या द्रावणाचा वापर जेली तयार करण्यासाठी करावा.द्रावण स्टीलच्या पातेल्यात घेऊन त्यात साखर मिसळून गॅसच्या मंद आचेवर शिजवावे. त्यामधील साखर (६५० ग्रॅम प्रति एक किलो ग्रॅम मिश्रणासाठी) पूर्ण विरघळून द्यावी. त्यानंतर मिश्रणात १ टक्के सायट्रिक ॲसिड मिसळावे.जेली तयार झाली, की नाही हे ओळखण्यासाठी त्याचा ब्रिक्स ६५ अंश आहे का ते पाहावे. तयार झालेली जेली आकर्षक पॅकिंगमध्ये पॅक करावी.पेरू सरबत तयार करण्यासाठी कमीत कमी १० टक्के रस, १५ टक्के टक्के साखर व आम्लता ०.३ ते ०.४ टक्के असावी. या प्रमाणानुसार १ किलो रस घेतल्यास त्यामध्ये १४०० ग्रॅम साखर, ७५ लिटर पाणी व २ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे. या प्रमाणानुसार १० लिटर सरबत तयार होऊ शकते.रसामध्ये साखर पाणी व सायट्रिक ॲसिड मिसळून सर्वसाधारण ८० ते ८५ अंश सेल्सिअस तापमानाला १० ते १५ मिनिटे उकळून घेऊन सरबत गाळून घ्यावे.तयार झालेले सरबत निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये हवाबंद करून ठेवावे.पेरू सिरप तयार करण्यासाठी पिकलेले फळे घ्यावीत. फळे स्वच्छ पाण्याने धुऊन ती कापून त्यापासून गर तयार करावा.गराचा ब्रिक्स २० ते २२ अंश आहे. का ते बघून घ्यावे. त्यामध्ये रसाचे प्रमाण ३५ टक्के ठेवून साखरेचे प्रमाण ६५ टक्के व आम्लता १.२ टक्के ठेवावी.एक किलो गर असेल तर त्यामध्ये १५०० ग्रॅम साखर व ६९ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे. नंतर सर्वसाधारण ८० ते ८५ अंश सेल्सिअस तापमानाला १०-१५ मिनिटे उकळून घेऊन ते सिरप निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये हवाबंद करून ठेवावे. संपर्क ः सोनल चौधरी, ८८०६७६६७८३ (के. के. वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)