सातारा जिल्ह्यातील डोंगरी, दुर्गम जावळी तालुक्यात श्रमिक जनता विकास संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून महिला, बाल विकास, ग्रामविकास आणि कृिपूरक उद्योगांना गती देण्यात आली आहे. शेतकरी बचत गटांची स्थापना करून सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. संस्थेच्या उपक्रमामुळे शेती आणि ग्रामविकासाला चालना मिळाली आहे.
सातारा जिल्ह्यातील पश्चिम विभागातील डोंगरी व दुर्गम जावळी तालुक्यात आपल्या शिक्षणाचा उपयोग स्थानिक, गरीब गरजू श्रमिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा ध्येयाने केडंबे गावातील अादिनाथ तुकाराम ओंबळे यांनी ग्रामविकासासाठी श्रमिक जनता विकास संस्थेची स्थापना केली. युवकांना संघटित करून संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू केले. या संस्थेचे कार्य सातारा, पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील ग्रामीण भागात पसरले आहे.
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला. शेतकरी गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती, दर्जेदार भात उत्पादनवाढीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. संस्थेच्या प्रयत्नातून जावळी, मेढा परिसरात १९९० पासून स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग सुरू झाला. आता या भागातील बावीस गावातील सुमारे पाचशेहून अधिक शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळले आहेत. या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी मातृरोपांची उपलब्धता आणि त्यापासून रोपेनिर्मिती आणि लागवडीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. चांगला दर मिळण्यासाठी बाजारपेठेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. योग्य तांत्रिक सल्ला आणि बाजारपेठेच्या उपलब्धतेमुळे या परिसरातील अनेक तरुण मुंबई सोडून सुधारित तंत्राने शेतीकडे वळले आहेत. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्पांतर्गत २०१५ साली केडंबे येथे वेण्णा व्हॅली फार्मस प्रोड्यूसर कंपनीची स्थापना करण्यात आली. कंपनीच्या माध्यमातून दर्जेदार तांदळाची निर्मिती, भाताचा पेंडा व कोंडा वापरून आळिंबी संवर्धन, भात कोंड्यापासून तेलनिर्मितीचे नियोजन आहे. सध्या कंपनीतर्फे स्ट्रॉबेरी संकलन आणि विक्रीचे नियोजन केले जाते. गेल्या वर्षी कंपनीने ३२ टन स्ट्रॉबेरी विक्री केली. सुनील गोळे हे कंपनीचे सचिव आहेत. वेगवेगळ्या माध्यमांतून सुमारे १५०० शेतकरी संघटित होऊन शेती विकासामध्ये सहभागी झाले आहे.
युवक संघटन आणि रोजगारनिर्मिती
केंद्र व राज्य सरकारसोबत राबविले जाणारे प्रकल्प
वाल्मीकी प्रकल्प, आदर्शगाव प्रकल्प योजना, जलस्वराज्य, वसुधंरा पाणलोट क्षेत्र ५२ गावांत काम, एकात्मिक अादिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव, स्वच्छ भारत अभियानांतर्गत सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील ४६ निर्मल ग्राम पडताळणी, सातारा जिल्ह्यातील कराड, म्हसवड नगर परिषद, लोणंद निर्मल नगर पंचायतीबरोबर सर्वेक्षणाचे काम केले जात आहे.
महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न
अादिवासी कातकरी संघटन आणि विकास प्रकल्प
ग्रामविकास संस्थांची निर्मिती श्रमिक जनता विकास संस्थेने आठ लोकसंस्थांची निर्मिती केली आहे. या संस्थामध्ये स्वतः सहभागी न होता त्यांना अधिकार देण्यात आले आहेत. या संस्थामध्ये वेण्णा व्हॅली फार्मर प्रोड्यूसर शेतकरी कंपनी, श्रमिक महिला बिगर शेती पतसंस्था, कोयनामाई महिला पतसंस्था, सह्याद्री इको अॅग्रो टुरिझम, श्रमिक अदिवासी शैक्षणिक सामाजिक मंडळ, अादिवासी कातकरी मच्छमारी सहकारी संस्था, श्रमिक श्वेत क्रांती, श्रमिक महिला बचतगट सहकारी संस्थेचा समावेश आहे. संस्थापक अध्यक्ष अदिनाथ ओंबळे, सचिव नेहा कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी लहू तरडे संस्थेच्या विविध उपक्रमात कार्यरत असतात.
संस्थेस मिळालेले पुरस्कार
- अादिनाथ ओंबळे, ९४२३०३२५१८
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.