केळी पीक सल्ला
केळी पीक सल्ला 
ॲग्रो गाईड

केळी सल्ला : थंडीचा परिणाम

डॉ. एस. व्ही. धुतराज, प्रा. आर. व्ही. देशमुख

सद्य:स्थितीत हवामान ढगाळ असून, हवेमध्ये गारठा आहे. तापमान बऱ्या­च प्रमाणात खाली गेलेले आहे. केळीच्या वाढीसाठी १६ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. हिवाळ्यात तापमान १६ अंश सेल्सिअसच्याही खाली जाते. अशा तापमानाचा केळी पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. थंडीचा परिणाम लागवडीवर होणारा परिणाम ऊतिसंवर्धीत रोपे व्यवस्थित सेट होण्यासाठी १६ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान लागते. सध्या केळीची कांदेबाग लागवड झालेली आहे. थंडी वाढल्याने मृगबाग, तसेच कांदेबाग लागवडीच्या केळीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुळावर होणारा परिणाम ऊतिसवंर्धीत रोपाची कांदेबाग लागवड झालेली आहे. मुळांची संख्या व लांबी कमी होते. मुळांच्या अन्न व पाणी शोषण क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

पानांच्या वाढीवर होणारा परिणाम केळीला सरासरी ३ ते ४ पाने प्रतिमहिन्याला येतात. थंडीच्या दिवसांत पाने येण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे प्रतिमहिना २ ते ३ पाने येतात. पाने कमी अंतरावर येतात, त्यामुळे पानांचा गुच्छ तयार होतो. अशा परिस्थितीत पानांचा फारच कमी भाग सूर्यप्रकाशच्या संपर्कात येतो, त्यामुळे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. झाडांची वाढ खुंटते आणि उत्पनावर परिणाम होतो. झाडाच्या वाढीवर होणारा परिणाम झाडाची वाढ मंदावते, वाढ कमी झाल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास उशीर लागतो. परिणामी, केळी निसवण्याचा कालावधी लांबतो, त्यामुळे एकूण उत्पादन खर्च वाढतो. बुंध्यावर व घडावर होणारा परिणाम केळीच्या बुंध्यावर व घडाच्या दांडयावर काळपट तपकिरी चट्टे दिसून येतात, हे चट्टे वाढत जातात व घड सटकतो. फळवाढीवर होणारा परिणाम घडातील केळीची वाढ फार हळुवार होते. परिमाणी, घड पक्व होण्याचा कालावधी ३० ते ४० दिवसांनी वाढतो. त्यामुळे घड कापनिस उशिरा येतो. रोगाच्या प्रादुर्भावावर परिणाम थंडीच्या काळात प्रामुख्याने केळीवर करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यावर वेळीच बुरशीनाशकाची फवारणी करणे योग्य ठरते.

उपाय योजना

  • ऊतिसंवर्धीत रोपांची योग्य निवड. ऊतिसंवर्धीत रोपांची लागवड केल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी व आळवणी करावी.
  • शेतात शिफारसीप्रमाणे शेणखत अथवा कंपोस्ट खत द्यावे. रासायनिक खतांचा योग्य वापर करावा.
  • बागेच्या चोहोबाजूने वारासंरक्षक उंच वाढणा­ऱ्या वनस्पती २ ते ३ ओळीत दाट लावाव्यात, त्यामुळे थंड  वारे अडवले जाते.
  • केळीच्या खोडालगत
  • आच्छादन करावे, जेणेकरून थंडीतील कमी तापमानाचा मुळांच्या वाढीवर  परिणाम होणार नाही.
  • केळीची कार्यक्षम पाने कापू नयेत, फक्त रोगग्रस्त पाने कापावीत व सुकलेली पाने बुंध्याभोवती तशीच  राहू द्यावीत. त्यामुळे बुंध्याचे थंडीपासून संरक्षण होईल.
  • थंडीच्या काळात पाणी रात्री द्यावे. पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस बागेच्या चोहोबाजूने बांधावर काडी कचरा जाळून धूर करावा.
  • करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा प्रॉपीकोनॅझोल (२५ ईसी) १ मिली प्रतिलिटर
  • पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.   
  •  ः डॉ. एस. व्ही. धुतराज, ७५८८६१२६३२  ः प्रा. आर.व्ही. देशमुख, ९४२१५६८६७४, (केळी संशोधन केंद्र, नांदेड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT