Swarali Pawar
शून्य मशागत म्हणजे नांगरणी न करता शेती करणे. पण ती प्रत्येक जमिनीत आणि पिकात फायदेशीरच असेल असं नाही.
मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो आणि रचना सुधारते. ओलावा टिकतो आणि मशागतीचा खर्च कमी होतो.
काळी, चिकण, क्षारपड किंवा भारी जमिनीत शून्य मशागत योग्य नाही. अशा जमिनीत माती मोकळी करण्यासाठी मशागत गरजेची असते.
हलकी आणि मध्यम जमीन शून्य मशागतीसाठी योग्य ठरते. जिथे माती भुसभुशीत आणि कमी चिकण असते तिथे चांगला परिणाम मिळतो.
ऊस, कापूस, हळद यांसारख्या पिकांना मोकळी जमीन आवश्यक असते. त्यामुळे या पिकांसाठी शून्य मशागत टाळावी.
गहू, ज्वारी, मका, बाजरी, हरभरा यांसाठी फायदेशीर ठरते. भाजीपाला पिकांमध्येही काही प्रमाणात वापर करता येतो.
शून्य मशागत केली तरी तण नियंत्रण करावंच लागतं. खुरपणी आणि इतर उपाय नियमित करणे गरजेचे आहे.
जमिनीचा प्रकार आणि पिकानुसार निर्णय घ्या. योग्य नियोजन केल्यास शून्य मशागत फायदेशीर ठरते.