Team Agrowon
गुळाच्या सध्याच्या विक्री व्यवस्थेत गुळाची प्रथमदर्शनी पसंती तसेच गुळाला बाजारात मिळणारा दर हा गुळाच्या रंगावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे.
गुळ उत्पादक गुळाला गडद पिवळा रंग येण्यासाठी हैड्रॉस, वाफा पावडर, भेंडी पावडर इ. रासायनिक पदार्थांचा अतिरिक्त वापर करतात.
हे रासायनिक पदार्थ मानवी आरोग्याला हानीकारक आहेत. या रासायनिक पदार्थांच्या वापरामुळे गुळातील गंधकाच प्रमाण वाढत.
अन्न भेसळ कायद्यानुसार गुळामध्ये सल्फरडाय ऑक्साईडच प्रमाण ७० भाग प्रति दशलक्ष (पीपीएम) पेक्षा जास्त असू नये.
हैड्रॉसच्या अतिवापराने सोडीयमच प्रमाण वाढत त्यामुळे हवेतील बाष्प गुळात शोषले जाऊन हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढताच गुळाला पाणी सुटते व त्यात बुरशीची वाढ होते.
असा गुळ खाण्याच्या दृष्टीने हानीकारक असतो. यासाठी गुळ तयार करताना रासायनिक पदार्थांचा वापर टाळणंच हितकारक आहे.
गुळ आकर्षक दिसण्यासाठी अनेक गुळउत्पादक रसायनांचा वापर करतात. त्यामुळे गुळाला पाणी सुटणे, बुरशी लागणे या सारख्या समस्या उद्भवतात.