Team Agrowon
ज्वारी, बाजरी हे भरडधान्य कोरडवाहू भागात उत्तम येते.
त्यामुळे जेथे शेती फक्त पावसावर अवलंबून आहे तेथे हे पीक उत्तम येते.
शिवाय ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. बाजारपेठेत देखील उपलब्ध आहे.
ज्वारी, बाजरी सोडून इतर भरडधान्ये ही आदिवासी भागांतच पिकविली जातात.
वाढत्या प्रचार-प्रसारामुळे त्यांना बाजारात मागणी वाढली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या या धान्याला भाव मिळत आहे.
मिलेट पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना यातून निर्यातीची संधी वाढली आहे.