Team Agrowon
कोरोना काळात आवकेत तब्बल ४० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसले. त्याची विविध कारणे होती.
मजुरांद्वारे चिंच काढणी शक्य होऊ शकली नाही. चिंचेचे मुख्य ग्राहक असलेल्या भेळ, पाणीपुरी व्यावसायिकांचे स्टॉल कमी झाले.
फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत वातावरण कोरडे असल्याने मार्केटमध्ये चिंचेची आवक चांगली असते.
यंदाच्या वर्षी या तीन महिन्यांच्या हंगामात पुणे बाजार समितीत २०० ते २५० टनांच्या आसपास आवक होण्याची शक्यता आहे.
हॉटेल व घरगुती कारणांसाठी भाज्या, सांबर, रस्सम, पाणीपुरी, भेळनिर्मिती, चिंच गोळी, जेली, चिंचोका पावडर आदींसाठी मागण
जेवढी पिवळी तेवढी ती जास्त आंबट असते. जुनी, काळसर रंगाची चिंच भेळ, पाणीपुरी, चाट यासाठी वापरण्यात येते. ही चिंच तुलनेने गोडसर असते.