sandeep Shirguppe
पावसाळा म्हणजे भाज्यांची कमतरता, कडाडलेले दर, गृहिणींना सतावणारी मुलांच्या डब्यांची चिंता नेहमीचीच आहे.
परंतु माळरानावर येणारी ''रानभाजी'' तुमचे आरोग्य आणि पैशांच्या बचतही करेल, रानभाज्यांची पारंपरिक ओळख ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आहे.
घोळ ही मूळव्याधासाठी गुणकारी असून रक्तशुद्धी, मूत्रपिंड, दातांतून रक्त जाण्यावर उपयोगी ठरते.
हृदयविकार, खोकला, श्वसनविकार, खरूज, वात, कफदोष कमी करण्यासाठी टाकळा भाजी खावी. याच्या बियांचा लेप जखमेवर गुणकारी असतो.
वाघाटी पित्तशामक असून सूतिका ज्वरामध्ये त्याचा काढा पिल्यास फायदा होतो. थायरॉईड ग्रंथी कार्यात बिघाड झाल्यास वाघाटी भाजीच्या सेवनाचा लाभ होतो.
दुधापेक्षा चौपट कॅल्शियम, तीन केळांइतके पोटॅशियम, सहा संत्र्यांइतके 'क' जीवनसत्त्व शेवगा भाजीत आढळून येते.
अंगावर पित्त उठल्यास याची पाने चोळतात. कफकारक, पौष्टिक व ज्वरनाशक अशी ही वनस्पती आहे. पानांची भाजी, पातळ भाजी करून खातात.
आघाडीची मुळे, पाने, फुले, फळे औषधी आहेत. आम्लतानाशक, रक्तवर्धक, पित्तसारक गुणधर्माचा आघाडा अंगातील चरबी करण्यासाठीही उपयुक्त आहे.
त्वचाविकार, सूज, पित्त कमी करण्यासाठी उपयुक्त केना भाजीच्या सेवनाने लघवी साफ होण्यास मदत होते.
गुळवेल, गोकर्ण, मायाळूसारख्या वनस्पती आपल्या घरातील कुंडीमध्येही वाढविता येतात.