Swarali Pawar
उन्हाळा लागला की अंगातून घाम धाराधार वाहतो आणि सतत पाणी प्यायची गरज वाटते. अशा वेळी आपल्या महाराष्ट्रात सहज मिळणारी काकडी शरीरासाठी खूपच उपयोगी ठरते.
काकडीत जवळपास ९५% पाणी असतं, म्हणून ती खाल्ली की अंगात गारवा येतो. लिंबू-मीठ टाकून काकडी खाल्ली तर उन्हाचा त्रास लगेच कमी झाल्यासारखं वाटतं.
उन्हात बाहेर काम करताना शरीरातील पाणी कमी होतं. काकडी खाल्ल्याने पाण्याची कमतरता भरून निघते आणि शरीर ताजंतवानं राहतं.
गावाकडं जेवणात काकडीचं कोशिंबीर असतंच, कारण ती पचन सुधारते. फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट हलकं राहतं.
काकडीत कॅलरीज खूप कमी असतात. मधल्या वेळेला भूक लागली तर चिप्सऐवजी काकडी खाल्ली तर वजन वाढत नाही.
उन्हामुळे त्वचा कोरडी पडते आणि काळवंडते. काकडी खाल्ल्याने तसेच चेहऱ्यावर लावल्याने त्वचा ताजी आणि गार राहते.
काकडीत पोटॅशियम असतं, जे रक्तदाब संतुलित ठेवायला मदत करतं. म्हणून ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी आहारात काकडी जरूर ठेवावी.
सॅलडमध्ये, ताकात, रायत्यात किंवा सरळ मीठ-मिरची टाकून खा. दररोज थोडी काकडी खा आणि या उन्हाळ्यात स्वतःला ठेवा एकदम “कूल”!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.