Swarali Pawar
फरदड कपाशीमुळे थोडे उत्पादन मिळते. मात्र पुढील हंगामातील उत्पादन आणि नफा कमी होतो.
फरदड घेतल्याने बोंड अळ्यांना बीटी प्रथिनांची सवय लागते. यामुळे अळ्यांमध्ये प्रतिकारशक्ती तयार होऊन कीड नियंत्रण कठीण होते.
फरदड कपाशीला योग्य पोषण मिळत नाही. धाग्याची लांबी, मजबुती व बाजारभाव कमी होतो.
पीक जास्त काळ शेतात राहिल्याने किडींना पोषक वातावरण मिळते. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो.
फरदड कपाशीमुळे अळ्यांना अन्न मिळत राहते. पुढील हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव लवकर वाढतो.
हंगामाच्या शेवटी पांढरी माशी मोठ्या प्रमाणात वाढते. फरदड घेतल्यास पुढील हंगामातही किडींचा धोका वाढतो.
फरदड कपाशीला नियमित पाणी व फवारण्या लागतात. यामुळे शेतीचा एकूण खर्च वाढतो.
फरदड कपाशीमुळे जमीन, पीक आणि नफा तिन्हींचे नुकसान होते. म्हणून शेतकऱ्यांनी फरदड कपाशी टाळावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.