Mahesh Gaikwad
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहायड्रेशनची समस्या होते. अशावेळी अनेकजण कोल्डड्रींक, ज्यूस पितात.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी बरेचजण लिंबू पाणीही पितात. लिंबू पाणी पिल्यामुळे थकवा दूर होतो.
आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात दररोज लिंबू पाणी का प्यावे, याबद्दल सांगणार आहोत.
उन्हाळ्यात लिंबू पाणी पिल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होत नाही. यामुळे शरीर हायड्रेट राहते.
याशिवाय दररोज लिंबू पाणी पिल्याने त्वचाही उजळते. तसेच शरीराची 'व्हिटामिन-सी'ची गरज पूर्ण होते.
'व्हिटामिन-सी'मुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी मदत होते. याशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रियाही सुधारते.
जर तुम्हाला अपचन, पित्त, बध्दकोष्ट किंवा पचनासंबंधीच्या समस्या असतील, तर दररोज लिंबू पाणी प्यायल्याने आराम मिळतो. ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे.