Mahesh Gaikwad
फळांचा राजा म्हणून आंबा प्रसिध्द आहे. भारतात विविध जातीच्या असंख्य आंब्यांचे उत्पादन होते.
जगभरात सर्वाधिक आंब्याचे उत्पादनही भारतातच होते. भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातीच्या आंब्याचे उत्पादन घेतले जाते.
भारतात मोठ्या प्रमाणात आंबा पिकवला जात असला, तरी प्रत्येक राज्यात पिकवल्या जाणाऱ्या आंब्यांची वैशिष्ट्येही वेगळी आहे.
पण भारतात पिकवला जाणारा सर्वात गोड आंबा कोणता आणि तो कोठे पिकवला जातो. हे तुम्हाला हे माहित आहे का?
भारतातील सर्वात गोड आंबा हा रत्नागिरीमध्ये पिकवला जातो. रत्नागिरीमध्ये पिकवला जाणारा हापूस चवीला सर्वात गोड आंबा आहे.
हापूस आंबा आपल्या सुगंध आणि चवीसाठी प्रसिध्द असल्याने जगभरामध्ये या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
त्यामुळे अन्य आंब्याच्या तुलनेत हापूस आंब्याचा दरही जास्त असतो.