Anuradha Vipat
दूध आणि फळे यांचे मिश्रण आयुर्वेदात 'विरुद्ध आहार' मानले जाते .
जरी ही दोन्ही स्वतंत्रपणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असली, तरी एकत्र खाल्ल्यास शरीरात विषारी घटक तयार होऊ शकतात, ज्यामुळे त्वचेचे आजार उद्भवू शकतात.
लिंबूवर्गीय फळांमधील सायट्रिक ॲसिड दुधाला त्वरित फाडते, ज्यामुळे पोटात तीव्र जळजळ होऊ शकते.
आपल्याकडे 'बनाना शेक' खूप आवडीने पिला जातो. परंतु, आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानानुसार केळी आणि दुधाचे मिश्रण शरीरात कफ वाढवते आणि पचनसंस्थेवर ताण आणते.
अननसातील 'ब्रोमेलेन' एन्झाईम दुधासोबत मिक्स झाल्यास पोटात विषारी रासायनिक प्रक्रिया घडून येते, ज्यामुळे उलट्या किंवा मळमळ होऊ शकते.
यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, तर दुधात फॅट्स असतात. हे दोन्ही एकत्र आल्याने पोट बिघडते
फळे खाणे आणि दूध पिणे यामध्ये किमान २ तासांचे अंतर असणे आवश्यक आहे.