Swarali Pawar
मेपासून चालू असलेल्या पावसामुळे डबकी तयार होत आहेत. यामुळे डास-माशांची संख्या वाढून विषाणूचा प्रसार वेगाने होतो.
वारंवार पावसात भिजल्याने जनावरं कमजोर होतात. थकवा आणि अपुरी विश्रांती यामुळेही त्यांची ताकद कमी होते.
लम्पी विषाणू २०२२ पासून अनेकदा बदलला आहे. त्यामुळे लसीकरण असूनही तो पूर्णपणे थांबत नाही.
या वेळी भारतीय शुद्ध वंशाच्या गायींना जास्त लागण होत आहे. मागच्या वेळी संकरित गायींवर परिणाम झाला होता.
मूळ वंशाच्या गायींची प्रतिकारक्षमता चांगली असते. त्यामुळे लागण झाल्यासही त्या हळूहळू बऱ्या होत आहेत.
काही भागात अजूनही जनावरांचे बाजार सुरू आहेत. त्यामुळे विषाणूचा प्रसार आणखी वेगाने होत आहे.
लम्पी २०% औषधोपचार आणि ८०% काळजीमुळे बरा होतो. शेतकरी जनावरांची योग्य काळजी घेत असल्याने बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.
पावसाळा संपल्यावर लम्पीवर नियंत्रण मिळेल, असा अंदाज आहे. नवजात वासरांना तातडीने लसीकरण करणे अत्यावश्यक आहे.