Mahesh Gaikwad
जेवण केल्यानंतर अनेकांना लगेच शौचास लागते किंवा जावेसे वाटते. असे असेल तर, ही एक आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या आहे.
जेवणानंतर पोटातील अन्न आतड्यांकडे ढकलले जाते. याला गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स असे म्हणतात. ही एक नैसर्गिक क्रिया आहे.
फायबरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे आतड्यांची हालचाल वेगवान होते. त्यामुळे लगेच शौचास जावावे वाटते.
कॉफी, चहा किंवा कोल्ड्रिंक्स या सारखे पेये पचनक्रिया जलद करतात. त्यामुळे अवेळी शौचास जाण्याची गरज भासते.
बऱ्याचदा दूध, ग्लूटेन किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोट बिघडते. हे पदार्थ शरीर लवकर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. परिणामी शौचास आल्यासारखे वाटते.
जास्त तणाव किंवा चिंता असल्यास त्याचा पचनावर परिणाम होतो. परिणामी जेवणानंतर लगेच शौचाची इच्छा निर्माण होते.
शिळे किंवा दूषित अन्न न पनचल्यामुळे आतड्यांना त्रास होतो. ज्यामुळे जुलाब किंवा वारंवार शौचाला जाण्याची गरज भासते.
इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) ही आतड्यांची समस्या आहे. याचा त्रास असणाऱ्या लोकांना जेवणानंतर लगेच शौचाला जावे लागते.