Mahesh Gaikwad
पावसाळ्याच्या दिवसांत बदलेल्या वातावरणामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो. अशावेळी पावसाळ्यात आरोग्यासाठी कोणती फळे खावी याची माहिती पाहूयात.
सफरचंद खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यामध्ये लोह, फायबर आणि व्हिटॅमिन-सी असतात., जे थकवा कमी करतात. यामुळे हाडेही मजबूत होतात.
पपईमुळे पचनशक्ती मजबूत होण्यासह पोटाचे आजार कमी होतात. पपई खाण्यामुळे अजीर्ण आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
मौसंबीमध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होते आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते.
नाशपाती या फळामध्ये पाणी आणि तंतुमय घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे पावसाळ्यात हायड्रेशनपासून बचाव होतो आणि पचनही सुरळीत ठेवते.
डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि अशक्तपणा कमी होतो. ठेवते.
पोटॅशियम घटक मुबलक असल्यामुळे पावसाळ्यात स्नायूंना बळकटी मिळण्यासाठी केळी उपयुक्त आहेत. केळी खाण्यामुळे पोटातील आम्लताकमी होते.
पावसाळ्याच्या दिवसांत आजरांपासून बचावासाठी फळे उपयुक्त आहेत. ताजी व स्वच्छ धुतलेली फळे खाल्ल्याने आरोग्य सुधारते, ऊर्जा वाढते आणि आजारांपासूनही बचाव होतो.