Aslam Abdul Shanedivan
सध्या राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून भूक मंदावणे, नाकातून रक्त येणे, चक्कर येणे, हात- पायाच्या तळव्यासह डोळ्यांची आग होणे अशा तक्रारी वाढतात.
यामुळे उन्हाळ्यात शरीराची काळजी घेताना योग्य आहाराचे सेवन देखील करायला हवे.
शक्यतो उन्हाळ्यात सकाळी कामासाठी घराबाहेर पडताना उपाशीपोटी निघू नये
शक्यतो सुती आणि फिकट रंगाचे कपडे घालावेत. याचबरोबर सिंथेटिक, काळे कपडे कटाक्षाने टाळावेत.
सकाळी उपाशीपोटी हे खा
आपले शरीर निरोगी ठेवण्यासह ऊर्जा मिळवण्यासाठी सकाळी उपाशीपोटी २-३ भिजवलेले अंजीर आणि थोडे भिजवलेले काळे मनुक्यांचे सेवन करावे.
काजू, बदाम, अंडी, भिजवलेले शेंगदाणे टाळून धने, जिरे, आमसूल, कोथिंबीरीचा वापर वाढवावा. यामुळे उष्णतेचे त्रास कमी होण्यास मदत होईल.
शक्यतो मुबलक फळांचा वापर करताना, आंबा, टरबूज, खरबूज, करवंद, द्राक्ष, मोसंबी, संत्री, सिताफळ, काकडी, ओले नारळ, वेलची केळी, अंजीर, कोहळा खावा