Mahesh Gaikwad
भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतातील मोठ्या संख्येने लोकांची उपजीविरका शेती आणि शेती आधारित व्यवसायांवर अवलंबून आहे.
भारतात भरडधान्य, तृणधान्य , डाळी, तेलबियांसह भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
कृषी क्षेत्रामुळे भाराताची जगभरात विशेष ओळख आहे. फळ उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात अव्वल स्थानी आहे. पण भारतातील कोणत्या राज्यांमध्ये फळांचे उत्पादन सर्वाधिक होते, हे तुम्हाला माहित आहे का?
भारतात सर्वाधिक फळांचे उत्पादन आंध्र प्रदेशमध्ये होते. देशातील एकूण उत्पादनाच्या १६.०४ टक्के फळे आंध्र प्रदेशात उत्पादित होतात.
आंध्र पाठोपाठ फळांच्या उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. देशातील एकूण फळ उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ११.०६ टक्के इतका आहे.
तिसऱ्या स्थानी उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये १०.०३ टक्के फळांचे उत्पादन होते. तर, चौथ्या स्थानी मध्य प्रदेश राज्याचा नंबर लागतो.
फळ उत्पादनात देशात अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांक कर्नाटक आणि तामिळनाडू ही राज्ये आहेत.