Mahesh Gaikwad
सध्या संपूर्ण देशभरात लोक उन्हाच्या झळा सोसेना झाल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे दिवसा बाहेर पडणे कठीण झाले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत पावले आपसुकच रसवंती गृहाकडे वळतात. उन्हाळ्यात उसाचा रस म्हणजे अमृताहून कमी नाही.
उन्हाळ्यात ठिकठिकाणी उसाची गुऱ्हाळे पाहायला मिळातात. या दिवसांत उसाचा रस पिणे आरोग्यासाठी फायद्याचे असते.
पंरतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उसाचा रस ठरावीक वेळेलाच प्यायला पाहिजे. कधीही उसाचा रस पिऊ नये. ज्यामुळे तुमची तब्येत बिघडू शकते.
रात्रीचे जेवण झाल्यानंतर फिरायला गेल्यानंतर अनेक लोक उसाचा रस पितात. ही वेळी रस पिण्यासाठी योग्य नाही.
उसाच्या रसामध्ये नैसर्गिकत: साखर असते. त्यामुळे सकाळी उपाशी-सकाळी उपाशीपोटी रस पिणे टाळावे.
आता तुम्ही म्हणाल सकाळी नाही, रात्री नाही मग दुपारची वेळ उसाचा रस पिण्यासाठी योग्य असेल. नाही ही वेळसुध्दा उसाचा रस पिण्यासाठी योग्य नाही.
कारण दुपारी कडक उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत ऊन उतरल्यावर ज्यावेळी उष्म्याचा प्रभाव कमी झाला असेल, अशावेळी उसाचा रस प्यावा.
तसेच सकाळी नाष्टा केल्यानंतर साधारणपणे तासाभराने तुम्ही उसाचा रस पिऊ शकता.