Aslam Abdul Shanedivan
केंद्र सरकारने वीज ग्राहकांचे हक्क लक्षात घेऊन वीज सुधारणा कायद्याला मंजुरी दिली आहे.
वीज कायदा २०२० मध्ये बिल, तक्रारी, नुकसानभरपाई व नवीन कनेक्शनचा कालावधी आदी बाबींचा विचार केला आहे.
या वीज सुधारणा कायद्यामुळे वीज जोडणीचा कालावधी प्रामुख्याने कमी झाला आहे.
यात मेट्रो शहरासाठी तीन दिवस, महापालिका क्षेत्र सात दिवस आणि ग्रामीण भाग ३० दिवसांऐवजी १५ दिवसांवर आणण्यात आला आहे
तसेच ५ किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचा खर्च वीज वितरण कंपनीला करायचा आहे
या नव्या सुधारणेमुळे विजेच्या वाहनांना चार्जिंग करायला वेगळे कनेक्शन ग्राहक मागू शकतो. ते देणे बंधनकारक आहे
ग्राहकांना आवडीप्रमाणे वीज कनेक्शन देणे व मीटर व बिलिंगबाबत पारदर्शकता बाळगणे असाही नियम करण्यात आला आहे