sandeep Shirguppe
पावसाळ्यात अनेक लोक फिरायला किंवा ट्रेकिंगला जातात. अशावेळी मोबाईलची कितीही काळजी घेतली तरी तो भिजतो.
तसेच अनेकवेळा जोरदार पाऊस असेल तर दुचाकीवर ऑफिसमधून घरी येताना किंवा चालत असलो तरी फोन भिजतो.
पाण्यामुळे फोन खराब होऊ शकतो. यामुळे पाण्यात फोन भिजला तर काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया.
फोनमधील सीम कार्ड आणि मेमरी कार्ड बाहेर काढावे. फोन भिजल्यानंतर बंद पडल्यास चार्जिंगला लावू नका.
अनेक लोक फोनमधील पाणी काढण्यासाठी जोरात झटकतात. पण असे करू नका.
फोन ओला झाला म्हणून अनेक लोक उन्हात ठेवतात. पण असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे फोनची बॅटरी खराब होऊ शकते.
अनेक लोक फोनमधील पाणी शोषले जाण्यासाठी तांदळामध्ये ठेवतात. असे करणे टाळावे.