Team Agrowon
फळ काढणी झाल्यानंतर द्राक्ष बागेत वेलीला काही काळ विश्रांती देऊन पुन्हा खरड छाटणी घेतली जाते.
प्रत्येक भागात या कालावधीत खरड छाटणी करण्याचे काम सुरू होईल. मात्र वातावरणातील जास्त तापमानाचे काही विपरीत परिणाम वेलीवर दिसून दोन महत्त्वाच्या अडचणी दिसून येतात.
खरड छाटणीनंतर डोळे एकसारखे व लवकर फुटणे अतिशय महत्त्वाचे असते. या प्रक्रियेमध्ये बागेतील तापमान व आर्द्रता महत्त्वाची जबाबदारी निभावते.
खरड छाटणीवेळी काड्यांची जाडी कमी जास्त असू शकते. त्यानुसार त्यावरील डोळ्यांची जाडीसुद्धा लहानमोठी असू शकते. त्याचा परिणाम डोळे मागे पुढे फुटण्यामध्ये होतो.
काडीवरील डोळे एकसारखे फुटण्याकरिता ओलांड्यावरील प्रत्येक काडीची जाडी एकसारखी असणे गरजेचे असते.
खरड छाटणीनंतर ७ ते ८ पानांच्या अवस्थेत फुटींची विरळणी व्यवस्थित झालेली असल्यास या वेळी थोडा उशीर लागला तरी फुटी एकसारख्या निघतील.
डोळे लवकर व एकसारखे फुटण्याकरिता वेलींचे खोड व ओलांडा रसरशीत असणे गरजेचे असते. त्यासाठी खरड छाटणीच्या ३ ते ४ दिवसांपूर्वी बोदामध्ये भरपूर पाणी दिले पाहिजे. त्यामुळे ओलांड्याचा रसरशीतपणा वाढेल, परिणामी, लवकर डोळे फुटतील.